Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्यवस्थेवर विश्वास’ न राहिल्यानेच डॉ. संपदा मुंडे’नी हातावर लिहीले आत्महत्येचे कारण..!* ...

व्यवस्थेवर विश्वास’ न राहिल्यानेच डॉ. संपदा मुंडे’नी हातावर लिहीले आत्महत्येचे कारण..!* *‘मेडिकल तपासणी-अहवाला बाबतच्या दबावाला’न झुकल्याने अत्याचार..!* *मुख्यमंत्र्यांकडून ‘डॉ.संपदा मुंडेच्या कर्तव्यदक्षते’चा उल्लेखही नाही..* *- काँग्रेस ची प्रखर टिका*

 

पुणे दि २६ आक्टों –

‘मेडिकल तपासणी’ अहवाला बाबतच्या दबावाला न झुकल्याने पोलीस अधिकाऱ्याकडून होणाऱ्या अत्याचार सहन कराव्या लागलेल्या, फलटण येथील सरकारी हॅास्पीटल मधील अविवाहित (कुमारीका) डॉ. संपदा मुंडे यांना अखेर आत्महत्या करावी लागते, ही शिव छत्रपतींच्या, सावित्रीबाई ज्योतिबा फुलेंच्या महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

एकेकाळी, महाराष्ट्राच्या पोलीसदलाचा क्रमांक देशात अग्रेसर होता मात्र तो खाली गेला हे ‘गृहखाते पुर्णवेळ – कार्यक्षमतेने’ सांभाळता न येण्याची ही घटना द्योतक आहे.

विद्यमान सत्ताधाऱ्यांकडून पोलीस दलातील प्रामाणिक पेक्षा अप्रामाणिक, अपराधी व अप-प्रवृत्तींना सत्ताधाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्यानेच अशा दुर्दैवी घटना घडत असल्याचे काँग्रेस’ने म्हंटले आहे. वैद्यकीय सेवेतील कर्तव्यदक्ष डॉ. संपदा मुंडे यांची आत्महत्या ही सुसंस्कृत समाजाच्या विवेकाला हादरवून टाकणारी शोकांतिका आहे. सत्ताधारी भाजप संबंधित प्रभावशाली नेत्यांनी तिच्यावर भ्रष्टाचारी पद्धतीने खोटा तपासणी अहवाल देण्यासाठी व्यवस्थेच्या माध्यमातुन दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे पुढे आले आहे.

‘वैद्यकीय सेवेतील कर्तव्य पुर्तते’ पोटी बक्षीस वा प्रशंसा नव्हे तर उलटपक्षी होणाऱ्या अत्याचारा बाबत लेखी पत्रांचा ही ऊपयोग होत नसल्याची व सत्ताधारी व्यवस्था भ्रष्ट झाल्याची जाणीव झाल्यामुळेच, ‘ज्या हातांवर मेहंदी लावायचे दिवस होते त्याच हातांवर डॅा संपदा मुंडे हीस आत्महत्येचे कारण लिहावे लागले’.. ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे.

कर्तव्यदक्ष डॅा. संपदा मुंडे आत्महत्येच्या पार्श्वभुमिवर फलटण मध्ये सरकारी कार्यक्रम रद्द करणे गरजेचे होते त्यातुन राज्य सरकारची संवेदनशीलता दिसून आली असती. मात्र तसे न करता संशयितांनी क्लीन चिट देण्याचा प्रयत्न व डॉ.संपदा मुंडे यांची खोटे मेडीकल सर्टिफिकेट न देणे बाबतच्या कर्तव्यदक्षते’ची मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘दखल ही न घेणे’ हीच भाजप’ची बेदरकारपणाची मानसिकता दर्शवत असल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी म्हटले आहे.

———————————————————

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments