Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedघाटाची तोडफोड थांबविण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन संपूर्ण राज्यातील शेकडो वारकरी सहभागी

घाटाची तोडफोड थांबविण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन संपूर्ण राज्यातील शेकडो वारकरी सहभागी

 

पुणे २५ एप्रिल : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जी तोडफोड सुरू आहे ती त्वरीत थांबवावी. तसेच ते कार्य पूर्ववत करावे या मागणीसाठी शुक्रवारी सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा आणि संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतिने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले की संबंधित मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविल्या जाईल.

उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हभप धर्मराज महाराज हांडे, हभप महेश महाराज नलावडे, हभप शालीकराम महाराज खंदारे, हभप तुकाराम महाराज कापसे आणि आळंदीचे हभप संतोष महाराज सांगळे यांच्या सहित संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शेकडो वारकरी उपस्थित होते.

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च केले. त्यामाध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या कार्यासाठी एमआयटीचे डॉ. विश्वनाथ दा. कराड, वै.किसन महाराज साखरे, वै. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर व वै. धुंडा महाराज देगलूरकर तसेच संप्रदायातील शेकडा थोर मान्यवरांनी पुढाकार घेतला होता. तसेच येथे घाटाचे सुंदर रेखीव व कोरीव कार्य सुरू आहे. दर्शनबारी, गोमुखाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचे व्यवस्थापन, तिर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे हा वारकरी व समाजातील लोकांसाठी अभिनव उपक्रम सुरू आहे. सुमारे १४५ फूट उंच सुवर्णजडित गरूड स्तंभाची निर्मिती ही सौदर्यात भर पाडणारी आहे.

सध्या स्थितीला येथे सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी जे कार्य सुरू आहे. त्यामुळे वारकरी भाविक भक्तांचे मन दुखावलेले आहे. याच भाविकांनी आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ घाटाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देऊन एक एक दगड लावला आहे. सध्या घाटाची दुरावस्था पाहून त्यांच्या अंतकरणात तिव्र वेदना होत आहे. त्यामुळेच हे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

येथे समस्त वारकर्‍यांनी शांततामय मार्गाने भजन करीत निषेध केला. यामध्ये संपूर्ण राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अधिक माहितीसाठी संपर्क

संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळा

हभप महेश महाराज नलावडे मो.नं.९८२२५४७७२७

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments