Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedतळेगावच्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये केमोथेरेपी वॉर्ड सुरु डॉ. सुरेश अडवाणी करणार...

तळेगावच्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये केमोथेरेपी वॉर्ड सुरु डॉ. सुरेश अडवाणी करणार कर्करुग्णांवर उपचार तळेगावमध्ये स्वतंत्र ओपीडी पुणे – भारतामध्ये दिवसेंदिवस कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरद्वारे तळेगाव येथे कॅन्सरसाठी एक विशेष ओपीडी आणि केमोथेरेपी वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. सुप्रसिध्द वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुरेश आडवाणी यांच्या मार्फत रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. डॉ. सुरेश आडवाणी यांच्या हस्ते नुकतेच केमोथेरेपी वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती तर, डॉ प्रताप राजेमहाडिक, गणेश खांडगे, सुधीन आपटे, शैलेश शहा आदी मान्यवरांनी देखील याठिकणी हजेरी लावली.अनुभवी वैद्यकीय ऑन्कोलॉजीस्ट आणि हेमेटोलॉजी तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी ल्युकेमिया आणि टार्गेटेड थेरपीत बोनमॅरो ट्रान्सप्लांटची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरातील प्रमुख ऑन्कोलॉजिस्टपैकी एक म्हणून डॉ. सुरेश अडवाणी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विविध प्रकारचे कर्करोग जसे की, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा, डोकं आणि मान, लहान मुलांमधील कर्करोग, रक्ताचा कर्करोग, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि मौखिक कर्करुग्णांवर यशस्वी उपचार करत त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले आहे. नव्याने सुरु झालेल्या केमोथेरपी वॉर्डच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ सुरेश अडवाणी सांगतात की, पूर्वीपासूनच तळेगाव शहराशी माझे घट्ट नाते आहे त्यामागचे कारण म्हणजे १९८२ साली मी पहिले यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले ज्यामध्ये रुग्ण तळेगावचा रहिवासी होता. आज टिजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमच्या माध्यमातून तळेगाव तसेच आसपासच्या परिसरातील रुग्णांना सेवा पुरविताना मला अतिशय आनंद होत आहे. याठिकाणी प्रगत तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.पूर्वी 90% रुग्णांमध्ये शेवटच्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सरचे निदान व्हायचै. मात्र वाढती जनजागृती आणि वेळोवेळी तपासणीमुळे हे प्रमाण 10% पर्यंत खाली पोहोचले आहे. वेळीच निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होते त्यामुळे आज स्तनाचा कर्करोग हा बरा होणारा आजार झाला आहे असे डॉ.अडवाणी यांनी स्पष्ट केले. २०१२ साली डॉ. सुरेश आडवाणी यांना भारत सरकारकडून भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले तर, २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना २००२ मध्ये धनवंतरी पुरस्कार, २००५ मध्ये वैद्यकीय काऊंसिल ऑफ इंडियाचा डॉ. बी.सी.रॉय यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, २०१४ मध्ये उज्जैन राष्ट्रीय क्रांतिवीर पुरस्कार आणि २००५ मध्ये ऑन्कोलॉजीमध्ये हार्वर्ड मेडिकल इंटरनेशनलचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात स्टेम सेल प्रत्यारोपण सुरू करण्याचे श्रेय डॉ. अडवाणी यांना जाते. टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख सांगतात की, या क्लिनिकचे अनावरण करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. एखाद्याचा अमुल्य जीव वाचवण्याच्या संधी या क्लिनिकची माध्यमातूम मिळाली आहे. रुग्ण सेवा तसेच सुरक्षा, कुशल डॅाक्टरांची टिम आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑन्को लाईफ सेंटरमध्ये नवीन ओपीडी आणि केमोथेरपी वॉर्ड सुरु करत कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ऑन्कोलॉजी मधील सुप्रसिध्द डॉ. सुरेश अडवाणी यांच्या या नव्या उपक्रमाचा मुंबई बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल. आपण एकत्र येऊन कर्करोगाविरुध्द लढा देऊया आणि आपले अमुल्य जीव वाचवू.

Previous article
योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळाश्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिनी सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजीशुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ : भालेराव, देवगावकर, शहरकर, कुंभार यांना यंदाचा पुरस्कारपुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी, डॉ. संजय देवडीकर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैदिक संशोधन मंडळ पुणे चे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदाचार्य शांतारामजी भानोसे, नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र), वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना देऊन ह.भ. प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात येणार आहेत. या शिवाय दिनांक २२जानेवारी २४ रोजी अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून १०वी १२वी व इतर परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्तीचे चेक वाटप होणार आहे.तरी सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
Next article
अग्निशमन विभागाकडून जाधववाडी येथील आग आटोक्यात————————————————————————————पिंपरी दि. ५ डिसेंबर २०२३:- चिखली येथील जाधववाडीमध्ये इमॅजिका पार्क इमारतीमधील कचरा नळी प्रणालीला दुपारच्या सुमारास लागलेली आग महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने विझवली, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांनी दिली आहे. या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही.आज दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी इमॅजिका पार्क, गट नंबर ४१४, ४१५, व ४२१(P), जाधववाडी, चिखली येथे आग लागल्याची वर्दी महापालिकेच्या अग्निशमन केंद्रास मिळाली. वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या कचरा नळी प्रणाली (garbage chute system) ला आग लागून इमारतीच्या दहाव्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत सर्व कचरा नळी प्रणाली जळाली. त्यामुळे ओपन डक मधुन सर्व मजल्यांना आगीच्या झळा लागल्या, आगीला बघून इमारतीमधील राहणारे रहिवासी घाबरले. सर्व नागरिकांनी इमारती मधून धाव घेऊन तळमजल्यावर येऊन आगीपासून बचाव केला. या आगीमुळे कुठलीही व्यक्ती जखमी झाली नाही. मात्र आगीमुळे इमारतीच्या भिंतीच्या पीओपीला तडे गेले. दहाव्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असे प्रथमदर्शी अग्निशमन दलाकडून निष्पन्न करण्यात आले. इमारतीमध्ये असलेल्या अग्नि सुरक्षितता प्रणाली मधून पाणी घेऊन स्थानिकांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून पूर्णतः आग विझल्याचे तसेच कुठलीही व्यक्ती जखमी नसल्याची खात्री करण्यात आली.चिखली उपअग्निशमन केंद्र येथील १, मोशी उपग्निशमन केंद्र येथील १ तसेच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथील १ अग्निशमन बंब, १ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म ब्रांन्टो वाहन, १ देवदूत अग्निशमन वाहन, तळवडे उपअग्निशमन केंद्र येथील एका अग्निशमन वाहन घटनास्थळी होते. आग नियंत्रणासाठी एकूण ३२ अग्निशमन कर्मचारी वर्गाने कार्य केले.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments