दिनांक 1 एप्रिल रोजी खासगी बस ने प्रवासासाठी ऑनलाईन वेबसाईट ची तपासणी केली असता आजचे दर आणि मे महिन्यातील सुट्टीतील दर यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. ह्या अन्यायाविरुद्ध आणि ग्राहकांच्या लुटी विरुद्ध कारवाई करण्याबाबतचे पत्र सप्रमाण परिवहन राज्यमंत्री ना. माधुरीताई मिसाळ यांना सादर केले.त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. मंदार रांजेकर यांनी अत्यन्त सौजन्याने संवाद साधून नेमका प्रश्न समजून घेतला. त्यानंतर मा. मंत्री महोदयांचे ओ एस डी श्री. संजय शिंदे यांनी तत्परतेने हालचाल करून मा. ना. माधुरीताई मिसाळ यांच्याशी चर्चा करून परिवहन आयुक्तांना प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस चालकांवर कारवाई चे निर्देश दिले.मा.माधुरीताईंच्या कार्यालयातील लिपिक उत्तम आव्हाड यांनी ते पत्र मला प्रेषित केले. गतिमान प्रशासनाचे हे उत्तम उदाहरण असून मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम किती संवेदनशीलतेने सर्व प्रश्न हाताळते हे ह्यावरून दिसून येते.
आता प्रत्यक्ष कारवाई ची प्रतीक्षा असून ह्या कार्यतत्परते बद्दल ना. माधुरीताई मिसाळ यांचे अभिनंदन व आभार.
उन्हाळ्याची सुट्टी असो व सणासुदीची, ह्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मूळ गावी जाणे असो नातेवाईकांना भेटण्यासाठीचा प्रवास असो अथवा सहलीला जाण्याचे नियोजन !!रेल्वे, राज्य परिवहन अश्या सर्वच ठिकाणी बुकिंग फुल्ल असते. अश्या वेळी बहुतांश नागरिक प्रवासासाठी खासगी बस चा वापर करतात.त्या काळात दुप्पट टिप्पट दर आकारून ग्राहकांची लूट केली जाते.


