Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedठराव : गणेशोत्सवाला 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून मान्यता द्यावी आणि पुण्यासाठी शंभर...

ठराव : गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून मान्यता द्यावी आणि पुण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा आमदार हेमंत रासने 

 : गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून मान्यता द्यावी आणि पुण्यासाठी शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी केली आहे.

 

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे. या उत्सवाची सुरुवात महाराष्ट्रात झाली असून, त्याला व्यापक जनआधार आहे. त्यामुळे या उत्सवाला महाराष्ट्राचा ‘राज्य उत्सव’ म्हणून अधिकृत मान्यता देणे आवश्यक आहे.

 

साल 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला सामूहिक बळ देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली. विविध जाती-धर्मांत सामाजिक समरसता घडवून स्वातंत्र्यसंग्रामासाठी लोकशक्ती एकत्र आणणे हा यामागचा मुख्य उद्देश होता. हा उत्सव महाराष्ट्रातून देशभर पसरला . वर्षभर चालणाऱ्या विधायक सामाजिक कामाच्या माध्यमातून गणेशोत्सवाने अनेक चांगले सामाजिक, राजकीय कार्यकर्ते घडविले आहेत.

 

या उत्सवाने धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपल्या तसेच समाज प्रबोधन ही केले. मनोरंजना बरोबर सामाजिक संदेश देणारे, वैज्ञानिक देखावे कार्यकर्ते रात्रंदिवस झटून सादर करतात. परंतु या उत्सवावर निर्बंध आल्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया जाते. त्यासाठी पुण्यासारख्या शहरात हा उत्सव 24 तास चालण्यासाठी शासनाने मदत करावी.

 

पोलिसांची संख्या मर्यादित असल्यामुळे या उत्सवासाठी जादा कुमक देणे आवश्यक. तसेच देश विदेशातून पर्यटक येत असल्यामुळे चांगले रस्ते,खड्डे मुक्त रस्ते, सुस्थितीतील पदपथ, आवश्यकतेनुसार स्ट्रीट लाईट, सुलभ सार्वजनिक शौचालय सुविधा, विशेषतः महिलांसाठी, आपत्ती व्यवस्थापन या व्यवस्था शासन यंत्रणेमार्फत प्रभावीपणे करणे आवश्यक आहे.

 

कसबा विधानसभा मतदारसंघात आम्ही लोक सहभागातून 56 क्रॉनिकल कचऱ्याचे स्पॉट बंद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यापैकी 22 क्रॉनिकल स्पॉटचे सुशोभीकरण दिनांक 22 जुलै रोजी पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. ज्याप्रमाणे G20 परिषदेच्या दरम्यान पुणे शहर सजवले होते त्याच प्रकाराची सजावट गणेशोत्सवामध्ये अपेक्षित आहे. पंढरपूरच्या वारीत राज्य शासनाने केलेल्या व्यवस्थापनाचे विशेषता मुख्यमंत्र्यांचे विरोधी पक्षातील आमदारांनी ही तोंडभरून कौतुक केले. त्याच धर्तीवर पुणे शहरात उत्सवाचे नियोजन करणे आवश्यक वाटते. त्यासाठी राज्य शासनाने पुणे शहरासाठी किमान 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी या उत्सवाला उपलब्ध करून द्यावा.

 

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक समरसता या दृष्टीने गणेशोत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सर्व जाती, पंथ आणि धर्माचे लोक या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सामाजिक अभिसरण, सौहार्द आणि एकात्मता यांना चालना मिळते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 2047 सालचा विकसित भारत घडविण्यासाठी या उत्सवाचे महत्त्व आहे.

 

आज गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे. गणेशोत्सव जगातील 175 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. या काळात परदेशातून आणि देशांतर्गत अनेक पर्यटक महाराष्ट्रात येत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील धार्मिक स्थळांचा मोठ्या प्रमाणात विकास करून ती पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र होतील यासाठी रोड मॅप आखून दिला आहे. त्याच धर्तीवर धार्मिक पर्यटनासाठी पुणे शहराच्या गणेशोत्सवाचा विचार करावा. यासाठी पंढरपूरच्या वारीच्या धर्तीवर गणेशोत्सवासाठीही स्वतंत्र नियोजन व निधीची तरतूद आवश्यक आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने गणेश उत्सवाला ‘महाराष्ट्राचा राज्य उत्सव’ म्हणून घोषित करावे आणि निधी उपलब्ध करून द्यावा ही विनं

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments