Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव राज्याचा महोत्सव झाला आता निर्बंधमुक्त होण्यासाठी प्रयत्नशील - हेमंत रासने* ...

गणेशोत्सव राज्याचा महोत्सव झाला आता निर्बंधमुक्त होण्यासाठी प्रयत्नशील – हेमंत रासने* *पुणे शहरातील गणेशोत्सव 24 तास खुला राहण्यासाठी आमदार हेमंत रासनेंकडून पाठपुरावा*

 

 

पुणे (दि २०): राज्य सरकारकडून गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून पावसाळी अधिवेशनात घोषित करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी रूपरेषा देखील जाहीर करण्यात आली. पुणे शहरातील गणेशोत्सव भक्तांसाठी 24 तास खुला रहावा तसेच संपूर्ण निर्बंधमुक्त पार पाडण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात असल्याचा आमदार हेमंत रासने यांनी सांगितलं आहे. राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रम आणि भरघोस निधीची घोषणा करण्यात आल्याने मोठ्या धुमधडाक्यात यंदाचा उत्सव साजरा होणार आहे.

 

पुणे शहरात गणेशोत्सव भक्तांना दर्शनासाठी 24 तास खुला रहावा. धर्म संस्कृती परंपरा जपत उत्सव साजरा करणे, जिवंत देखावे, खाण्यासाठी हॉटेल्स, पीएमपीएमल तसेच मेट्रोची सेवा या काळामध्ये २४ तास उपलब्ध रहावी, सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलिसांची संख्या वाढवत निर्बंधमुक्त आणि भयमुक्त गणेशोत्सव साजरा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे रासने म्हणाले.

 

*भुयारी मार्गांचा डीपीआर अंतिम टप्प्यात*

करून मतदारसंघातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शनिवार वाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवार वाडा असा भुयारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून डीपीआर करण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे. एका महिन्याभरामध्ये याचे काम पूर्ण होऊन, पुढील प्रक्रियेला सुरुवात केली जाईल अशी माहिती रासने यांनी दिली आहे. विधानसभा अधिवेशनादरम्यान देख शहर आणि मतदारसंघातील वाहतूक कोंडीवर प्रश्न मांडल्याचे रासने यांनी सांगितले.

 

*राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्ताराला गती*

ऐतिहासिक वर्षाचे जतन करणाऱ्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या विस्तारीकरणाच्या मला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. त्या माध्यमातून संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला गती मिळणार आहे.

 

*एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर यशस्वी पाठपुरावा*

कसबा मतदारसंघात अभ्यासिकांच्या माध्यमातून हजारो स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत असतात, स्पर्धा परीक्षा करत असताना त्यांना अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यातीलच एक म्हणजे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर न लागणे अथवा या निकालाच्या प्रक्रियेला विलंब होणे. या संदर्भात हेमंत रासने यांनी सभागृहात लक्षवेधी मांडली. लक्षवेधी म्हणतात गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या गट क लिपिक व टंकलेखक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments