हा महत्त्वपूर्ण टप्पा भारत आपल्या पायाभूत सुविधांशी कशा प्रकारे जोडला जात आहे, त्याचे परीक्षण आणि व्यवस्थापन करत आहे याची पुर्नव्याख्या करत आहे
आघाडीचे दूरसंचार आणि IoT सोल्यूशन्स पुरवठादार (व्होडाफोन आयडिया लिमिटेड)ची उद्योग शाखा असलेला वी बिझनेस भारताच्या ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणण्याच्या तयारीत आहे. आज एंटरप्राइझ विभागाने म्हणजेच या उद्योग शाखेने पुढील तीन वर्षांत संपूर्ण भारतभरात 1.2 कोटी स्मार्ट मीटर्स सक्षम करण्याच्या योजना जाहीर केल्या आहेत. यामुळे वीबिझनेस भारतातील स्मार्ट युटिलिटी परिवर्तनाच्या अग्रभागी पोहोचले असून त्यायोगे एक मजबूत, अनुकूल आणि पर्यावरणपूरक ऊर्जा पायाभूत सुविधा विकसित करण्यास चालना मिळणार आहे.
इंडिया स्मार्ट ग्रिड मिशनशी सुसंगती राखत हा व्यापक उपक्रम अॅडव्हान्स्ड मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (AMI) आणि IoT सोल्यूशन्समध्ये नाविन्यपूर्णतेला चालना देईल. अॅडव्हान्स्ड तसेच प्रीपेड वीज मीटर्सचा वापर निश्चित करत त्याद्वारे एक डिजिटलदृष्ट्या सक्षम ऊर्जा परिसंस्था तयार करण्याचे ध्येय आहे. यामुळे वितरण कंपन्यांना (DISCOMs) अॅग्रीगेट टेक्निकल अँड कमर्शियल (AT&C) तोट्यात घट करता येईल आणि ग्राहकांना त्यांच्या ऊर्जा वापराबाबत त्वरित माहिती मिळेल.
या उपक्रमाच्या केंद्रस्थानी वी बिझनेस IoT स्मार्ट सेंट्रल प्लॅटफॉर्म असून तो लाखो कनेक्ट केलेल्या मीटर्सवर सर्वसमावेशक व्हीजीबीलिटी म्हणजेच दृश्यमानता आणि नियंत्रण पुरवितो. भारतातील स्मार्ट मीटर्स व्यवस्थापित करण्याचा पाच वर्षांहून अधिक अनुभव घेतलेला वी बिझनेस AMI क्षेत्रातील आपली कौशल्ये सिध्द करत आहे आणि ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या गरजांसाठी विस्तारीत आणि लवचिक उपाययोजना तयार करत आहे.
वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणीही सहज एकत्रीकरण आणि जलद विस्तार सुनिश्चित करत वी बिझनेसने स्मार्ट मीटर्सच्या पूर्व व पश्चात ऑनबोर्डिंगसाठी सुसूत्र कार्यपद्धती विकसित केल्या आहेत. टेल्को-ग्रेड प्रोटोकॉल्स वापरून, वी बिझनेस युटिलिटीज आणि ग्राहकांसाठी डेटा संरक्षणाची हमी देत आहे. जोडीला AMI रोलआउट्स अधिक जलद आणि विश्वासार्ह असावित यासाठी कंपनीकडे एक अत्याधुनिक IoT प्रयोगशाळा असून तिथे पूर्वजोडणी तपासणी आणि प्रमाणीकरण केले जाते.
या विकासावर भाष्य करताना वी’चे चीफ एंटरप्राइझ बिझनेस ऑफिसर अरविंद नेवातिया म्हणाले,
“आम्ही स्मार्ट मीटर ऊर्जा परिसंस्थेतील अग्रणी आहोत. 2018 मध्ये आम्ही पहिल्यांदा स्मार्ट मीटर्सची जोडणी केली आणि IoT लॅब सारख्या नावीन्यपूर्ण गोष्टी सुरू केल्या. आमची हीच बांधिलकी आम्ही पुढे चालू ठेवत आहोत आणि संपूर्ण भारतभर 1.2 कोटी स्मार्ट मीटर्सची जोडणी करण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे ऊर्जा हानी कमी होईल, कार्यक्षमता वाढेल आणि ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावेल.”


