Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरजातीय विवाह पद्धती समाजात अपेक्षित बदल घडवतील* ...

आंतरजातीय विवाह पद्धती समाजात अपेक्षित बदल घडवतील* -श्रीकांत शिरोळे

*पुणे* :- ” सध्या जाती-धर्मातील निर्माण करणे अस्थिरता माजवणे हे राजकीय षडयंत्र सुरू असताना आंतरजातीय विवाह करणाऱ्या दापत्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करणे म्हणजे, जातीधर्मातील सलोखा ठेवून समाजातील अपेक्षित बदल घडवणारा असेल” असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत शिरोळे यांनी व्यक्त केले.
गोखलेनगर येथील पाच-पांडव सभागृह सभागृह येथे अखिल जनवाडी मंडळाने आयोजित केलेल्या *जातीअंतासाठी करू काही* या विषयावर डॉक्टर आनंद करंदीकर यांचे कविता वाचन कार्यक्रमात ते बोलत होते. “ते पुढे म्हणाले आपला देश 18 पगड जातीत विभागला गेला आहे विविध मध्ये एकता हे आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे कुठलाही कारभार करताना सर्वांना एकत्र घेऊनच काम करावे लागणार आहे”
याप्रसंगी आंतरजातीय विवाह करणाऱ्या 50 दापत्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला गणेशोत्सवात काळात रोज काही दापत्यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते श्रींची आरती व सत्कार सोहळ्याचे नियोजन करणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष उमेश वाघ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना सांगितले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास काळे,जयंत दौंडकर,जयश्री काळे, आदित्य माळवे, मधुरा निम्हण, मधुकर पवार आदी उपस्थित होते.
लाल बहादूर मंडळाचे आकाश धोत्रे यांनी सूत्रसंचालन तर जागृती सेवा संस्थेच्या मंगला पाटील यांनी सर्वांच्या आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments