Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपायाभूत सुविधेसाठी नवनिर्मिती, धोरण व ज्ञानाचे एकत्रीकरण गरजेचे  ...

पायाभूत सुविधेसाठी नवनिर्मिती, धोरण व ज्ञानाचे एकत्रीकरण गरजेचे  डॉ.प्रसाद यांचे मत ःनिकमार विद्यापीठात ९ वी आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न   

 

पुणे, २८ ऑगस्टः” भविष्यात एक मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक नवोन्मेष, शाश्वत प्रशासन आणि संशोधन यांना व्यवहाराशी एकत्रित करणे आवश्यक आहे. ज्ञानावर आधारित निर्णय घेणे भारताच्या विकासाचा पुढील टप्पा निश्चित करेल” असे मत हरियाणाचे माहिती प्रमुख आयुक्त आणि माजी मुख्य सचिव डॉ.टी.व्ही.एस.एन.प्रसाद यांनी व्यक्त केले.

 

बांधकाम क्षेत्रात देशातील आघाडीचे विद्यापीठ निकमार ने आयोजित केलेल्या कंस्ट्रक्शन, रियल एस्टेट, इफ्रास्ट्रक्चर अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट वरील नव्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

 

या प्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. सुषमा कुलकर्णी आणि परिषदेचे संयोजक व विद्यापीठाच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता डॉ. रजनीकांत राजहंस उपस्थित होते.

 

या वेळी विविध श्रेणींमध्ये उत्कृष्टतेला देखील येथे मान्यता देण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला.

 

डॉ. प्रसाद म्हणाले, शहरीकरण, हवामान बदल आणि संसाधान कार्यक्षेमतेच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शिक्षण जगत आणि उद्योग यांच्यात अधिक सधन सहकार्य असले पाहिजे. सध्याच्या युगात, पायाभूत सुविधांमध्ये थ्रीडी प्रिंटिंग, बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग, सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्याचबरोबर ड्रोन आणि रोबोट्सचा देखील वापर होतांना दिसतो. या क्षेत्रात शाश्वत बांधकाची आवश्यकता आहे. यासोबतच, संशोधन, पुरवठा साखळी व्यवस्थापन, नियोजन आणि वेळापत्रक, शाश्वत साहित्य आणि तंत्रज्ञान आणि काळानुसार डिजिटल परिवर्तन आवश्यक आहे.

 

डॉ. सुषमा कुलकर्णी यांनी सर्व सहभागींच्या योगदानाचे कौतुक केले आणि बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि सहकार्य पुढे नेण्यासाठी विद्यापीठाच्या वचनबद्धतेवर भर दिला.

 

या वर्षी परिषदेमध्ये १८ देशांमधील २०० हून अधिक शोधनिबंधांचा सहभाग होता. ज्यामध्ये सहा प्रमुख विषयांचा समावेश होता. संशोधन, केस स्टडीज, डॉक्टरेट संगोष्ठी, प्रॅक्टिशनर इनसाइटस, उद्योग प्रदर्शन आणि हॅकेथॉन.

 

डॉ. रजनीकांत राजहंस यांनी परिषदेला यश मिळवून देण्यासाठी उद्योग व धोरणकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नांवर प्रकाश टाकला. तसेच सर्वांचे आभार मानले.

०००००००००००००००००००००००००००००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments