Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedअग्निशमन विभागाकडून जाधववाडी येथील आग आटोक्यात------------------------------------------------------------------------------------पिंपरी दि. ५ डिसेंबर २०२३:- चिखली येथील...

अग्निशमन विभागाकडून जाधववाडी येथील आग आटोक्यात————————————————————————————पिंपरी दि. ५ डिसेंबर २०२३:- चिखली येथील जाधववाडीमध्ये इमॅजिका पार्क इमारतीमधील कचरा नळी प्रणालीला दुपारच्या सुमारास लागलेली आग महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेने स्थानिक रहिवाश्यांच्या मदतीने विझवली, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उपआयुक्त मनोज लोणकर यांनी दिली आहे. या घटनेत कुठलीही जीवीत हानी झाली नाही.आज दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी इमॅजिका पार्क, गट नंबर ४१४, ४१५, व ४२१(P), जाधववाडी, चिखली येथे आग लागल्याची वर्दी महापालिकेच्या अग्निशमन केंद्रास मिळाली. वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या इमारतीच्या कचरा नळी प्रणाली (garbage chute system) ला आग लागून इमारतीच्या दहाव्या मजल्यापासून तळमजल्यापर्यंत सर्व कचरा नळी प्रणाली जळाली. त्यामुळे ओपन डक मधुन सर्व मजल्यांना आगीच्या झळा लागल्या, आगीला बघून इमारतीमधील राहणारे रहिवासी घाबरले. सर्व नागरिकांनी इमारती मधून धाव घेऊन तळमजल्यावर येऊन आगीपासून बचाव केला. या आगीमुळे कुठलीही व्यक्ती जखमी झाली नाही. मात्र आगीमुळे इमारतीच्या भिंतीच्या पीओपीला तडे गेले. दहाव्या मजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी, असे प्रथमदर्शी अग्निशमन दलाकडून निष्पन्न करण्यात आले. इमारतीमध्ये असलेल्या अग्नि सुरक्षितता प्रणाली मधून पाणी घेऊन स्थानिकांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाकडून पूर्णतः आग विझल्याचे तसेच कुठलीही व्यक्ती जखमी नसल्याची खात्री करण्यात आली.चिखली उपअग्निशमन केंद्र येथील १, मोशी उपग्निशमन केंद्र येथील १ तसेच पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथील १ अग्निशमन बंब, १ हायड्रोलिक प्लॅटफॉर्म ब्रांन्टो वाहन, १ देवदूत अग्निशमन वाहन, तळवडे उपअग्निशमन केंद्र येथील एका अग्निशमन वाहन घटनास्थळी होते. आग नियंत्रणासाठी एकूण ३२ अग्निशमन कर्मचारी वर्गाने कार्य केले.

Previous article
तळेगावच्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये केमोथेरेपी वॉर्ड सुरु डॉ. सुरेश अडवाणी करणार कर्करुग्णांवर उपचार तळेगावमध्ये स्वतंत्र ओपीडी पुणे – भारतामध्ये दिवसेंदिवस कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरद्वारे तळेगाव येथे कॅन्सरसाठी एक विशेष ओपीडी आणि केमोथेरेपी वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. सुप्रसिध्द वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुरेश आडवाणी यांच्या मार्फत रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. डॉ. सुरेश आडवाणी यांच्या हस्ते नुकतेच केमोथेरेपी वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती तर, डॉ प्रताप राजेमहाडिक, गणेश खांडगे, सुधीन आपटे, शैलेश शहा आदी मान्यवरांनी देखील याठिकणी हजेरी लावली.अनुभवी वैद्यकीय ऑन्कोलॉजीस्ट आणि हेमेटोलॉजी तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी ल्युकेमिया आणि टार्गेटेड थेरपीत बोनमॅरो ट्रान्सप्लांटची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरातील प्रमुख ऑन्कोलॉजिस्टपैकी एक म्हणून डॉ. सुरेश अडवाणी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विविध प्रकारचे कर्करोग जसे की, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा, डोकं आणि मान, लहान मुलांमधील कर्करोग, रक्ताचा कर्करोग, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि मौखिक कर्करुग्णांवर यशस्वी उपचार करत त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले आहे. नव्याने सुरु झालेल्या केमोथेरपी वॉर्डच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ सुरेश अडवाणी सांगतात की, पूर्वीपासूनच तळेगाव शहराशी माझे घट्ट नाते आहे त्यामागचे कारण म्हणजे १९८२ साली मी पहिले यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले ज्यामध्ये रुग्ण तळेगावचा रहिवासी होता. आज टिजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमच्या माध्यमातून तळेगाव तसेच आसपासच्या परिसरातील रुग्णांना सेवा पुरविताना मला अतिशय आनंद होत आहे. याठिकाणी प्रगत तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.पूर्वी 90% रुग्णांमध्ये शेवटच्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सरचे निदान व्हायचै. मात्र वाढती जनजागृती आणि वेळोवेळी तपासणीमुळे हे प्रमाण 10% पर्यंत खाली पोहोचले आहे. वेळीच निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होते त्यामुळे आज स्तनाचा कर्करोग हा बरा होणारा आजार झाला आहे असे डॉ.अडवाणी यांनी स्पष्ट केले. २०१२ साली डॉ. सुरेश आडवाणी यांना भारत सरकारकडून भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले तर, २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना २००२ मध्ये धनवंतरी पुरस्कार, २००५ मध्ये वैद्यकीय काऊंसिल ऑफ इंडियाचा डॉ. बी.सी.रॉय यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, २०१४ मध्ये उज्जैन राष्ट्रीय क्रांतिवीर पुरस्कार आणि २००५ मध्ये ऑन्कोलॉजीमध्ये हार्वर्ड मेडिकल इंटरनेशनलचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात स्टेम सेल प्रत्यारोपण सुरू करण्याचे श्रेय डॉ. अडवाणी यांना जाते. टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख सांगतात की, या क्लिनिकचे अनावरण करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. एखाद्याचा अमुल्य जीव वाचवण्याच्या संधी या क्लिनिकची माध्यमातूम मिळाली आहे. रुग्ण सेवा तसेच सुरक्षा, कुशल डॅाक्टरांची टिम आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑन्को लाईफ सेंटरमध्ये नवीन ओपीडी आणि केमोथेरपी वॉर्ड सुरु करत कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ऑन्कोलॉजी मधील सुप्रसिध्द डॉ. सुरेश अडवाणी यांच्या या नव्या उपक्रमाचा मुंबई बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल. आपण एकत्र येऊन कर्करोगाविरुध्द लढा देऊया आणि आपले अमुल्य जीव वाचवू.
Next article
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन बुधवार दि.०६ डिसेंबर २०२३ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे स. ११.०० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा. श्री.अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज हा देश एकसंघ आहे, त्यामुळे अनेक जाती धर्मांचे लोक गुणागोंविदाने एकत्र नांदताना दिसतात ते केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या भारतीय संविधाना मुळेच..! असे थोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित दलितांचे कैवारी आणि ज्ञानाचा अथांग सागरास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हाच्यावतीने अभिवादन करतो. तसेच प्रदेश सरचिटणीस ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनाचा आढावा समस्त जनांसमोर मांडला, बाबासाहेबांची आंबेडकरी लोकशाही जगाचे तत्वज्ञान ठरलेली असून, पुढे देश प्रगती पथावर घेऊन जाण्याकरिता आंबेडकरांचे विचाराच देशाला तारक ठरतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष शेखर काटे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, विद्यार्थी अध्यक्ष यश साने, सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष गंगा धेंडे, भोसरी विधानसभा संघटक प्रकाश सोमवंशी, खजिनदार दिपक साकोरे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, झोपडपट्टी विभाग अध्यक्ष संतोष निसर्गध, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, महिला शहर कार्याध्यक्ष उज्वला ढोरे, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्ष संगीता कोकणे, व्ही.जे.एन.टी. सेल महिला अध्यक्ष निर्मला माने, महिला प्रदेश सरचिटणीस शोभा पगारे, तेजस सिंह, पिंपरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अबरार शेख, भोसरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष अथर्व कोकणे, उपाध्यक्ष संदिपान झोंबाडे, कुमार कांबळे, उपाध्यक्ष प्रदीप गायकवाड, सरचिटणीस रवींद्र सोनवणे,उदय ववले, वॉर्ड अध्यक्ष रिजवाना सय्यद, शेनाज जकाते, जावेद जकाते, प्रथमेश कांबळे, मकरंद शिंदे, मनिष शेडगे, समर्थ गव्हाणे, चैतन्य सोनवणे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे इत्यांदी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments