महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना वेदनादायी आहेत. एखाद्याला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करणे खूप वाईट आहे. सर्वांनी एकत्र बसून राजकीय जीवनातील आचारसंहिता निश्चित केली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. विनोद तावडे यांच्यावर झालेले आरोप दुर्दैवी आहेत. तावडे हे अभाविपपासून समर्पित कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविरोधात कट रचणा-यांचे चेहरे एक दोन दिवसात समोर येतील. तावडेंच्या विरोधातील कट विरोधकांवर उलटला आहे….
अशी प्रतिक्रिया पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.


