Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतःची आणि भाजपा पक्षांसह, राज्यातल्या शेतकऱ्यांची...

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतःची आणि भाजपा पक्षांसह, राज्यातल्या शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली..!* *शेतकऱ्यांनो एक दमडीही पीक आणि शेती कर्ज भरू नका, अजित पवार अर्थमंत्री यांचे अवहान शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन ने संघटनेने सपसेल धुडकावले.*

 

 

पुणे.,

दिनांक 29 मार्च 2025.

*उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतःची आणि भाजपा पक्षांसह, राज्यातल्या शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली..!*

 

*शेतकऱ्यांनो एक दमडीही पीक आणि शेती कर्ज भरू नका, अजित पवार अर्थमंत्री यांचे अवहान शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन ने संघटनेने सपसेल धुडकावले.

 

*राज्यातील तमाम शेतकऱ्यांना जाहीर आव्हान., एक दमडीही पीक अथवा शेती कर्ज भरू नका.., विठ्ठल राजे पवार अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक;- शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन संपूर्ण भारतचे, महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांना जाहीर आव्हान, अजित पवार साहेब शेतकऱ्यांची ऊणे सबसिडी, भावांतर योजना, पिक विमा दुधाचे अनुदान चूकारी,चे, उसाचे थकित एफआरपी व्याजासह शेतकऱ्यांना, द्या, सरकारचे व बँकांचे येने पैसे निघाले तर शेतकरी बँकेला भरतील.! पण पुणे सबसिडीचा हिशोब अधिकचा निघाला तर सरकारने शेतकऱ्यांना देणं लागत आहे म्हणून शेतकऱ्यांनी 31 तारखेलाच नव्हे यापुढे सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती आणि त्यानंतर शेतमालाचा बेसरेट गॅरंटी हमीभाव जाहीर होत नाही तोपर्यंत शेतकरी शेती पिक कर्जाचा एक दमडीही कर्ज भरणार नाहीत,!*

*सरकारकडे शेतकऱ्याच्या पुणे सबसिडीचे हजारो कोटी रुपये थकबाकी आहेत, ते सरकार शेतकऱ्यांना देणं लागतं त्यामध्ये सर्वात प्रथम १) भावांतर योजने तले 30 ते 35 हजार कोटी रुपये मागील तीन वर्षांमधील आहेत २)ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 22 ते 25 हजार कोटी रुपये मागील पाच वर्षांमधले आहेत ३) दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जवळपास 14 हजार कोटी रुपये, ४) कापूस सोयाबीन इतर चुका रे चे, व इतर यांच्या मधले जवळपास 12 ते 1500 कोटी रुपये आणि पिक विम्यातले जवळपास बारा ते पंधरा हजार कोटी रुपये, तसेच पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान यामधले 7000 कोटी रुपये असे महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्याचे सरकारकडे येणे आहे ती रक्कम सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांना अदा करावी, ती रक्कम पंधरा टक्के व्याजासह द्यावी त्यानंतर राज्यातले सर्व शेतकरी बँकेचे कर्ज सव्याज भरतील. असे अर्थमंत्री अजित पवार यांचे शेती कर्ज भरण्याविषयीचे अवहान संघटनेने धुडकावत अर्थमंत्री सरकारला चॅलेंज केलेले आहे. असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जय किसान*

 

*विठ्ठल राजे पवार.*

अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन संपूर्ण भारत .

अध्यक्ष;- एनयूबीसी महासंघ वेस्टर्न भारत.

भ्रमणध्वनी क्रमांक 9422517044, ई-मेल ऍड्रेस sjvmss.vp9@gmail.com.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments