Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedसूर्यापासून मातीपर्यंत: सौरऊर्जेवर शेती करण्यासाठी, MSKVY 2.0 ची अवादा ची वचनबद्धता

सूर्यापासून मातीपर्यंत: सौरऊर्जेवर शेती करण्यासाठी, MSKVY 2.0 ची अवादा ची वचनबद्धता

बारामती — अवादा ग्रुप सध्या महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या (एमएसकेव्हीवाय) अंमलबजावणीत सक्रिय आहे. ही योजना कृषी क्षेत्रात सौर ऊर्जेद्वारे आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा उद्देश बाळगते. या पुढाकाराच्या माध्यमातून अवादा राज्यातील कृषी क्षेत्रासाठी शाश्वत ऊर्जा हस्तांतरण सक्षम करत आहे आणि ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनमानात विकेंद्रीत(डीसेंट्रलाइज्ड) सौर ऊर्जेद्वारे सकारात्मक बदल घडवत आहे.
ही योजना प्रथम 2017 मध्ये सुरू झाली होती, ज्यामध्ये कृषिप्रधान उपकेंद्राजवळ सौर प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना दिवसाकाठी विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, असा उद्देश होता. योजनेच्या प्रभावी परिणामांची दखल घेत, महाराष्ट्र शासनाने एमएसकेव्हीवाय 2.0 (मिशन 2025) अंतर्गत या योजनेचा विस्तार केला आहे. या टप्प्यात, 2025 पर्यंत राज्यातील 30% कृषी फीडर सौर ऊर्जा आधारित करण्यासाठी 7,000 मेगावॅट सौर क्षमतेच्या अंमलबजावणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हे विकेंद्रीत प्रकल्प 0.5 मेगावॅट ते 25 मेगावॅट क्षमतेचे असून, कृषिप्रधान भागांतील वितरण उपकेंद्राच्या 5–10 किमी अंतरावर उभारले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा सातत्याने वीज मिळत असून, शेतीचे उत्पादन व कार्यक्षमतेत मोठी सुधारणा होत आहे.
या पुढाकाराचा एक प्रमुख भागीदार म्हणून अवादा ग्रुप सध्या नाशिक, पुणे, सांगली, यवतमाळ, अहमदनगर, बीड, अमरावती, हिंगोली, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये एकूण 1,132 मेगावॅट (एसी) क्षमतेचे सौर प्रकल्प राबवत आहे. हे प्रकल्प ग्रामीण भागातील ऊर्जा परिस्थिती बदलत असून, महागड्या डिझेलवरील अवलंबन कमी करत आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत आहेत.
एमएसकेव्हीवाय 2.0 अंतर्गत अवादा सुमारे 875 मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल महाराष्ट्रातच तयार करणार आहे, ज्यामुळे ‘मेक इन महाराष्ट्र’ मोहिमेला चालना मिळणार असून स्थानिक उद्योग क्षेत्रही मजबूत होणार आहे.
अवादा या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण आणि वेगळी ठरते कारण त्यात केवळ तंत्रज्ञानाची उभारणी नाही, तर समुदाय सहभाग, कार्यान्वयन आणि देखभाल (ओ अँड एम) यांचा समावेश आहे. ही प्रक्रिया अवादा ग्रुपचे अध्यक्ष श्री. विनीत मित्तल यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक आहे, जे नेहमीच सर्वसमावेशक आणि स्थानिक पातळीवर आधारित ऊर्जा हस्तांतरणाचे समर्थक राहिले आहेत.
एमएसकेव्हीवाय 2.0 मुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने सुधारले आहे. दिवसा मिळणाऱ्या सातत्यपूर्ण वीजेमुळे पाणीपुरवठा सुरक्षित व प्रभावी पद्धतीने करता येतो, खर्च कमी होतो आणि उत्पादनक्षमता वाढते. अनेक शेतकरी सौर प्रकल्पांसाठी जमीन भाड्याने देऊन प्रति हेक्टर वार्षिक 1.25 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवत आहेत. या योजनेतून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि युवक व महिलांसाठी कौशल्यविकासाची संधी मिळत आहे. शिवाय, यामुळे सुरक्षितता वाढली असून जीवनमान सुधारले आहे, आणि ग्रामपंचायतींना सामूहिक कल्याणासाठी निधी वापरता येत आहे.
अवादा एमएसकेव्हीवाय अंतर्गत स्वच्छ ऊर्जेच्या प्रसाराचा एक सशक्त उदाहरण घालून देत आहे. सौर ऊर्जा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून, केवळ शेती क्षेत्राचा कार्बन फूटप्रिंट कमी करत नाही, तर ग्रामीण भागात हवामान स्थित्यंतराशी जुळवून घेण्याची क्षमता देखील तयार करत आहे.
ही योजना अशा काळात राबवली जात आहे जेव्हा भारताने 2030 पर्यंत 500 गीगावॅट नॉन-फॉसिल इंधनावर आधारित ऊर्जा क्षमता साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या राष्ट्रीय मोहिमेला अवादा कडून कृषी सौर क्षेत्रात मिळणारा हातभार केवळ महत्त्वाचा नाही, तर समावेशक आणि शाश्वत ऊर्जा भविष्याचे प्रतीकही आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments