Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी* 

जनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे-जिल्हाधिकारी* 

 

 

पुणे, दि.२९: ‘जनगणना २०२७’ अंतर्गत स्व-गणना पूर्ण केलेल्या नागरिकांनी त्यांना प्राप्त झालेला स्व-गणना ओळखक्रमांक (एसई आयडी) प्रगणकांस देण्यात यावा तसेच ‘घरसुचीकरण व घरांची गणना’ प्रक्रिया विहीत वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकांद्वारे विचारण्यात येणारी माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात प्रगणकाद्वारे १६ मे पासून ‘घरसुचीकरण व घरांची गणना’ करण्यात येत आहे, यामध्ये नागरिकांनी १ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेत भरलेली माहितीची पडताळणी करुन अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांनी एसईआयडी उपलब्ध करून दिल्यानंतरच ‘घरयादी आणि गृहगणना’ प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ज्यांनी स्व-गणना केलेली नाही, अशाची देखील गणना करुन ते अंतीम करण्याचे काम काम १४ जून २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे.

 

जनगणना कायदा १९४८ च्या तरतुदींनुसार राबवला जाणारा अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय उपक्रम आहे. प्रभावी धोरण निर्मितीला पूरक ठरणारा आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात योगदान देणारा विश्वसनीय माहितीचा संग्रह (डेटा) निर्माण करण्यासाठी सक्रिय लोकसहभाग आवश्यक आहे, असेही श्री. पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments