Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवारसाहक्का’ने नव्हे तर.. संघर्षातून उभे रहात आहे राहूल गांधींचे नेतृत्व* …!  ...

वारसाहक्का’ने नव्हे तर.. संघर्षातून उभे रहात आहे राहूल गांधींचे नेतृत्व* …!             – काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी 

 

राहुल गांधींचा जन्मदिन छायाचित्र प्रदर्शनातून साजरा…!

उलगडले व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू …!

*‘निःस्वार्थी राष्ट्रसेवा व राष्ट्र भक्ती’चा डीएनए राहुल गांधीं मध्ये…!*

 

पुणे,  दि २० : June

राजेशाही-निज़ामशाही-मोघल साम्राज्यात विभागलेला भारत, ब्रिटिशांच्या गुलामगिरीत खितपत होता.

मात्र महात्मा गांघी, नेहरू, पटेल, आझाद, भगतसिंह – राजगुरूंसह काँग्रेस नेत्यांच्या व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान व दीर्घ संघर्षातून स्वातंत्र्योत्तर ‘प्रजासत्ताक भारत’ उभारल्याचे श्रेय निर्विवादपणे काँग्रेस’लाच् जात असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्याचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व राज्य एनएसयुआय च्या आजी – माजी पदाधिकारी ऋत्विक धनवट, अक्षय कांबळे व सहकारी यांनी ‘काँग्रेस नेते व संसदीय विरोधी पक्ष नेते मा राहूल गांधी’ यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून,  राहुल’जीं च्या जीवनातील विविध घटकांची व्यथा जाणून घेण्याचा त्यांच्या प्रयत्नांचा व त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंबाबतची माहिती दर्शवणारे छायाचित्र प्रदर्शनाचे समारोप प्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटन जेष्ठ नेते उल्हासदादा पवार, मोहन जोशी, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व दिप्ती चवधरी यांचे उपस्थितीत झाले. सदरचे छायाचित्र प्रदर्शन बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे आयोजित करण्यात आले होते.

समोरोप प्रसंगी बोलतांना, गोपाळदादा पुढे म्हणाले की, देशाच्या उभारणीतील योगदान व उत्तरदायीत्वाचे भान ठेवून ‘गांधी – नेहरू’ कुटुंबातील नेत्यांनी, ‘बापूं’च्या लोककल्याणकारी राज्याची संकल्पना रुजवली व संविधानीक लोकशाही व्यवस्था मजबूत करत देशात राष्ट्रीय संपत्तीचे जाळे निर्माण केले.

देशाच्या एकात्मतेसाठी, राजधर्माच्या कर्तव्य भावनेतून अपेक्षित योगदान व बलिदान दिले, यातूनच नेहरू -गांधी कुटुंबियांचे निःस्वार्थी नेतृत्व, देशात परीस्थिती प्रमाणे प्रस्थापित झाले. देशाप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून, वारसा हक्काने नव्हे तर.. प्रतिकूल परिस्थितीतुनही संघर्षातून काँग्रेस नेते राहूल जी गांधींचे नेतृत्व उभे रहात असल्याचा व त्यावर (२०२४ लोकसभेत, कांग्रेसच्या दुप्पट जागा वाढून) जनतेचे समर्थन मिळत असल्याचे, उचित समाधान काँग्रेसजनांस असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्याचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

संकुचित स्वहिता’पेक्षा व्यापक राष्ट्रहित जोपासण्याचा डीएनए’ राहुल गांधीं मध्ये अवतरल्यानेच, ६० वर्षांच्या देशाच्या प्रगतीच्या व पुण्याईच्या कर्म संचित पाठबळावर, देशवासियांचा आशिर्वाद व प्रेमाच्या शक्तीवर राहुलजी गांधी यांनी देशाचा चतुष्कोण साधणारी सु १२,००० किमी चीं पदयात्रा थंडी -उन – पावसाची तमा न बाळगता केली, या देशप्रेमापोटी केलेल्या कर्म संचित वाटचालीचे श्रेय देश-हितामध्ये बदलून, नियती राहुलजींना संधी दिल्यावाचून राहणार नसल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

“६० वर्षांच्या सत्य, वास्तविकतेच्या व कर्तव्यशील नैतिकतेच्या देश साक्षी असलेल्या कर्म संचित पुण्याई’वर;

१२ वर्षांच्या केवळ स्वहीत साधणाऱी, सत्ताधीशांची अनैतिक कारकिर्द’ हावी ठरणार नसल्याचा आत्मविश्वास ही गोपाळदादा तिवारी यांनी दर्शवला.

१२ वर्षांच्या तपपुर्तीचे ढोल बडवतांना नेहरू- गांधी वर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे एक ही आरोप सिद्ध करू न शकल्याने, निःस्वार्थी राष्ट्रसेवा व निर्दोष राष्ट्र भक्ती’चा डीएनए’ राहुल गांधींच्या पुर्वज नेत्यांकडून अर्थात पं नेहरू, इंदीराजी व राजीवजी या दिवंगत पंतप्रधानाकडून त्यांचे मध्ये उतरल्याचे सिद्ध झाले असल्याची पुस्ती ही त्यांनी जोडली.

समारोप प्रसंगी सर्वश्री सिध्दार्थ जांभूळकर, साहेबराव क्षीरसागर, ॲड श्रीकांत पाटील, लक्ष्मीकांत हुंडेकर, राजेश सुतार आदि उपस्थित होते.

———/———————————/

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments