Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedयोगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळाश्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी...

योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळाश्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी दिनी सोमवार दि.११ डिसेंबर २०२३ रोजीशुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ : भालेराव, देवगावकर, शहरकर, कुंभार यांना यंदाचा पुरस्कारपुणे : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या वेदविद्या संवर्धन उपक्रमाअंतर्गत योगीश्वर याज्ञवल्क्य वैदिक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, दिनांक ११ डिसेंबर सायंकाळी ५ वाजता सारसबागेजवळील वेदशास्त्रोत्तेजक सभा येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती वेद विद्या संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला अध्यक्ष विलास देशपांडे, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत जोशी, कोषाध्यक्ष दिलीप संभूस, वेदमूर्ती आहिताग्नी सुधाकरपंत कुलकर्णी, डॉ. संजय देवडीकर यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे वैदिक संशोधन मंडळ पुणे चे संचालक सुब्रह्मण्यम वेरीवेंटी आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदाचार्य शांतारामजी भानोसे, नाशिक हे उपस्थित राहणार आहेत. निखिल भालेराव यांना योगीश्वर याज्ञवल्क्य पुरस्कार ( १५०००/- व मानपत्र), वेदांग शहरकर यांना आदर्श छात्र पुरस्कार, ( ११०००/- व मानपत्र), श्रीमती रत्नमाला गजानन जोशी स्मरणार्थ सेवारत्न पुरस्कार (१००००/- व मानपत्र) अरुण देवगावकर यांना देऊन ह.भ. प. बाळू कुंभार यांना ज्ञानेश्वरी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.याशिवाय अथर्व हरदास, कौस्तुभ पाठक, प्रशांत जोशी, चिन्मय जोशी, अभय जोशी यांना छात्र पुरस्कार(प्रत्येकी २५००/-) प्रदान करण्यात येणार आहेत. या शिवाय दिनांक २२जानेवारी २४ रोजी अयोध्येत पुण्यातून रामजन्मभूमी स्थळी पूजेसाठी जाणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार असून १०वी १२वी व इतर परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व शिष्यवृत्तीचे चेक वाटप होणार आहे.तरी सर्व पुणेकरांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Previous article
सहिष्णूता म्हणजे वासना व क्रोधाला नियंत्रित करणेडॉ. योगेन्द्र मिश्रा यांचे विचार ; आळंदी येथे जागतिक सहिष्णुता सप्ताहाचे उद्घाटनपुणे, दि.६ डिसेंबर :” सहिष्णूतेचा अर्थ म्हणजे वासनेला व क्रोधाला नियंत्रित करणे आहे. आळंदी ही ज्ञानाची भूमी आहे. हे तीर्थ क्षेत्र मानवाला विषयाच्या भवसागरातून पार करून किनार्‍यावर घेऊन जाणारे आहे. त्यामुळे येथे येणार्‍या वारकर्‍याचे अंतःकरण पवित्र बनते ”.असे विचार काशी येथील विद्वान व हिंदी सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. योगेन्द्र मिश्रा यांनी व्यक्त केले.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’,विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे संत शिरोमणी तत्त्वज्ञ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७२७ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने लोकप्रबोधनपर आयोजित करण्यात आलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.या सोहळ्याला आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष ह.भ.प. मारुती महाराज कुर्‍हेकर, ह.भ.प. किसन महाराज साखरे यांचे चिरंजीव चिदम्बर महाराज साखरे. विठ्ठलराव काळोखे, बाळासाहेब काळोखे, अशोक उमरगेकर, सुरेश वडगावकर, शिवसेना शहर प्रमुख राहुल चव्हाण, देहूचे रमेश काळोखे, तुकाराम काळोखे व ह.भ.प. डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.तसेच सौ.उषा विश्वनाथ कराड, माईर्स एमआयटीच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण व प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.डॉ. योगेन्द्र मिश्रा म्हणाले,” आळंदी ही संवेदनाची सृष्टी असल्याने येथे सत्याचे संस्कार मिळतात. आपल्यातील जिज्ञासा वृद्धिंगत होऊन समाधान मिळते. आम्हाला देवतांचे संस्कार अंगीकरण्यासाठी जिभेवरील स्वाद आणि शब्द यांचा जपून वापर करावा.”प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,”सामाजिक कार्य करतांना नागरिकांचा विरोध होतच असतो. परंतू आपले लक्ष विचलित करुन नये असा सल्ला मला तत्कालिन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी दिला होता. त्यांच्या या सूत्रानुसार आळंदी येथे घाटाची निर्मिती झाली. येथे गरूड स्तंभ ४३ दिवसांमध्ये व बद्रिनाथ येथे ६३ दिवसात माता सरस्वती मंदिराची निर्मिती झाली. विनम्रता, श्रध्दा, भक्ती आणि कर्मयोग याचेच हे फलीत आहे.”अशोक उमरगेकर म्हणाले,” आळंदी साठी राजकीय क्षेत्र व महाराष्ट्र सरकारला जे काम करता आले नाही ते काम डॉ. कराड यांनी केले. त्यांनी शिक्षणाबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रात अतुलनिय कार्य केले आहे. सर्वप्रथम वारकर्‍यांनासाठी शौचालयांची निर्मिती केल्यानंतर त्यांनी घाट व गरुड स्तंभ उभा केला.”चिदंबर महाराज साखरे म्हणाले.” सहिष्णूता ही व्यापक असून त्यात विश्व चिंतनाचा समावेश आहे. त्यामुळे सर्व तीर्थ क्षेत्र हे ज्ञान तीर्थ क्षेत्र व्हावे. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी कार्य करावं. आपल्या मनाचा तोल सांभाळण्याचे कार्य संत वाग्ड़मय करतात त्यामुळे त्यांचे वाचन करावे.”प्रा.स्वाती कराड चाटे म्हणाल्या, “भारतीय शिक्षण पद्धतीत अध्यात्माचा समन्वय व्हावा या साठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहेत. परंतु डॉ. कराड यांनी ४०वर्षापूर्वीच हा प्रयोग केला आहे. तीर्थ क्षेत्रापासून ज्ञान तीर्थ क्षेत्रापर्यंतचा हा प्रवास अद्भूत आहे.”डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” ७०० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी विश्वात्मक कल्पना मांडून जाती पातीमध्ये दुभांगलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला होता. आळंदीची भूमी जगाच्या इतिहासात मानवाचे गुरूकुल बनले आहे. वारी म्हणजे मानवाच्या चित्त शुद्धीचा आध्यत्मिक महोत्सव आहे.”डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, ” हा मंच ज्ञानाची दिवाळी साजरा करण्यासाठी आहे. डॉ. कराड व ह.भ.प. साखरे महाराज यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला कळण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. इंद्रायणीच्या दोन्हीं किनार्‍यावर शिक्षण घेणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढावी. तसेच देशातील सर्व नद्यांच्या किनार्‍यावर शिक्षणाची ज्ञान केंद्रे बनावीत.”त्यानंतर पं.वसन्तराव गाडगीळ व विठ्ठलराव काळोखे यांनी आपले विचार मांडले.डॉ. सुदाम महाराज पानेगावकर यांनी प्रस्तावना केली व नंतर इंद्रायणी मातेची आरती झाली.ह.भ.प. शालीकराम खंदारे यांनी सूत्रसंचालन केले व महेश महाराज नलावडे यांनी आभार मानले.
Next article
तळेगावच्या ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये केमोथेरेपी वॉर्ड सुरु डॉ. सुरेश अडवाणी करणार कर्करुग्णांवर उपचार तळेगावमध्ये स्वतंत्र ओपीडी पुणे – भारतामध्ये दिवसेंदिवस कर्करुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने टीजीएच-ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरद्वारे तळेगाव येथे कॅन्सरसाठी एक विशेष ओपीडी आणि केमोथेरेपी वॉर्ड सुरू करण्यात आले आहे. सुप्रसिध्द वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सुरेश आडवाणी यांच्या मार्फत रुग्णांवर उपचार केले जाणार आहे. डॉ. सुरेश आडवाणी यांच्या हस्ते नुकतेच केमोथेरेपी वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख यांची विशेष उपस्थिती होती तर, डॉ प्रताप राजेमहाडिक, गणेश खांडगे, सुधीन आपटे, शैलेश शहा आदी मान्यवरांनी देखील याठिकणी हजेरी लावली.अनुभवी वैद्यकीय ऑन्कोलॉजीस्ट आणि हेमेटोलॉजी तज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी ल्युकेमिया आणि टार्गेटेड थेरपीत बोनमॅरो ट्रान्सप्लांटची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जगभरातील प्रमुख ऑन्कोलॉजिस्टपैकी एक म्हणून डॉ. सुरेश अडवाणी यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी विविध प्रकारचे कर्करोग जसे की, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग, पोटाचा, डोकं आणि मान, लहान मुलांमधील कर्करोग, रक्ताचा कर्करोग, कोलोरेक्टल, प्रोस्टेट आणि मौखिक कर्करुग्णांवर यशस्वी उपचार करत त्यांना नवे आयुष्य मिळवून दिले आहे. नव्याने सुरु झालेल्या केमोथेरपी वॉर्डच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ सुरेश अडवाणी सांगतात की, पूर्वीपासूनच तळेगाव शहराशी माझे घट्ट नाते आहे त्यामागचे कारण म्हणजे १९८२ साली मी पहिले यशस्वी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले ज्यामध्ये रुग्ण तळेगावचा रहिवासी होता. आज टिजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटरमच्या माध्यमातून तळेगाव तसेच आसपासच्या परिसरातील रुग्णांना सेवा पुरविताना मला अतिशय आनंद होत आहे. याठिकाणी प्रगत तंत्रज्ञानासह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.पूर्वी 90% रुग्णांमध्ये शेवटच्या टप्प्यात ब्रेस्ट कॅन्सरचे निदान व्हायचै. मात्र वाढती जनजागृती आणि वेळोवेळी तपासणीमुळे हे प्रमाण 10% पर्यंत खाली पोहोचले आहे. वेळीच निदान झाल्याने लवकर उपचार करणे शक्य होते त्यामुळे आज स्तनाचा कर्करोग हा बरा होणारा आजार झाला आहे असे डॉ.अडवाणी यांनी स्पष्ट केले. २०१२ साली डॉ. सुरेश आडवाणी यांना भारत सरकारकडून भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले तर, २००२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना २००२ मध्ये धनवंतरी पुरस्कार, २००५ मध्ये वैद्यकीय काऊंसिल ऑफ इंडियाचा डॉ. बी.सी.रॉय यांचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, २०१४ मध्ये उज्जैन राष्ट्रीय क्रांतिवीर पुरस्कार आणि २००५ मध्ये ऑन्कोलॉजीमध्ये हार्वर्ड मेडिकल इंटरनेशनलचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला. केवळ मुंबईतच नव्हे तर संपूर्ण भारतात स्टेम सेल प्रत्यारोपण सुरू करण्याचे श्रेय डॉ. अडवाणी यांना जाते. टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. उदय देशमुख सांगतात की, या क्लिनिकचे अनावरण करताना आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. एखाद्याचा अमुल्य जीव वाचवण्याच्या संधी या क्लिनिकची माध्यमातूम मिळाली आहे. रुग्ण सेवा तसेच सुरक्षा, कुशल डॅाक्टरांची टिम आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून ऑन्को लाईफ सेंटरमध्ये नवीन ओपीडी आणि केमोथेरपी वॉर्ड सुरु करत कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ऑन्कोलॉजी मधील सुप्रसिध्द डॉ. सुरेश अडवाणी यांच्या या नव्या उपक्रमाचा मुंबई बरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना नक्कीच फायदा होईल. आपण एकत्र येऊन कर्करोगाविरुध्द लढा देऊया आणि आपले अमुल्य जीव वाचवू.
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments