महाराष्ट्र, १७ जानेवारी २०२५:- महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या केंद्र स्थानी, शेतकऱ्यांनी केळी आणि कापूस पिकांचे संरक्षण आणि वाढ करण्यासाठी मारुत ड्रोन अकादमीच्या अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. केळीचे पीक १० फूट उंचीपर्यंत पोहोचत असल्या कारणाने, करपा सारख्या बुरशीजन्य रोगांना प्रतिबंध करण्यासाठी कीटकनाशक फवारणीची आवश्यकता अत्यंत महत्त्वाची आहे, ज्यामुळे पानांना रोग होऊ शकतो आणि केळीच्या झाडांवरील कार्यशील पानांची संख्या कमी होऊ शकते. योग्य फवारणी केल्याशिवाय, केळीच्या झाडाची वाढ गंभीररित्या खुंटते.
या भागातील प्रशिक्षित ड्रोन पायलट निरंजन आता केळीच्या बागांवर कीटकनाशके फवारण्यासाठी ड्रोन उडवत आहेत . मारुत ड्रोन अकादमीमध्ये प्रशिक्षण घेऊन मिळालेल्या त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना केवळ स्वतःचेच शेत व्यवस्थापित करण्यास मदत झालेली नाही तर केळी आणि कापूस लागवडीत गुंतलेल्या शेजारच्या शेतकऱ्यांनाही फायदा झालेला आहे. “मला पूर्वी मजुरांच्या कमतरतेचा आणि इतक्या मोठ्या पिकांवर हाताने फवारणी करण्याच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता, ड्रोनच्या मदतीने मी खूप जलद आणि अधिक प्रभावीपणे फवारणी करू शकतो,” असे निरंजन सांगतात.
कापूस शेतकऱ्यांसाठीचे आव्हानही तितकेच गंभीर आहे. कापसाच्या लागवडीमध्ये सामान्य असलेला बुंदाई रोग कापसाचे वजन कमी करून आणि फुलांना अडथळा आणून लक्षणीय नुकसान करतो. या शेतकऱ्यांसाठी, कीटकनाशके फवारणी करणे पारंपारिकपणे मजुरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत असे, कारण त्यांना शेतामध्ये वैयक्तिक रूपाने प्रवेश करावा लागत असे, जेथे कीटकनाशके वापरणे गरजेचे असे. शिवाय, या धोकादायक परिस्थितीत, विशेषतः जेव्हा पिके दाट असत किंवा पाऊस पडल्यानंतर शेतात फवारणी करावी लागत असे तेव्हा कामगार अनेकदा काम करण्यास तयार नसत.
मारुतच्या ड्रोनने या आव्हानांना सामोरे जायचा उपाय शोधून काढला आहे. वैयक्तिक मजुरीपेक्षा, ड्रोन मोठ्या क्षेत्रावर जलद आणि कार्यक्षमतेने फवारणी करू शकतात – फक्त एका तासात ५ एकरपर्यंत. पावसाळ्यात ही कार्यक्षमता विशेषतः महत्वाची असते, कारण कीटकनाशकांचा स्थिरपणा बहुतेकदा ओल्या परिस्थितीमध्ये बिघडते. ड्रोनने फवारणी करताना, पीक फक्त एका तासात खते शोषून घेऊ शकते, ज्यामुळे हवामान बदलले तरीही प्रभावी उपचार होण्याची सुनिश्चित असते. . याउलट, वैयक्तिक रूपाने फवारणीसाठी प्रति एकर किमान एक दिवस लागतो आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर त्याचा प्रभाव कमी होऊन जातो.
या प्रभागातील मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी ड्रोन देखील अमूल्य ठरत आहेत. शेतकऱ्यांसाठी साप हे एक मोठा धोका आहे आणि ड्रोन फवारणीमुळे शेतात कामगारांची गरज संपुष्टात येते, ज्यामुळे साप चावण्याचा धोका कमी होतो.
महत्वपूर्ण फायदे असून सुद्धा, ड्रोनसाठी मर्यादित सरकारी अनुदानासारख्या आव्हानांमुळे ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब मंदावला आहे. शेतकऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे की लवकरच या अडथळ्यांवर मात केली जाईल, कारण त्यांना माहित आहे की ड्रोन तंत्रज्ञानाचा त्यांच्या शेती पद्धतींवर आधीच व्यापक परिणाम झाला आहे. .
निरंजन म्हणतात की, “हे तंत्रज्ञान खरोखरच एक मोठे परिवर्तन घडवून आणणारे आहे. त्यामुळे आमचा वेळ वाचला आहे, मजुरीचा खर्च कमी झाला आहे आणि कीटकनाशकांच्या वापराची आमची कार्यक्षमता वाढली आहे. मला विश्वास आहे की अधिक समर्थन, आणि जागरूकता मिळाल्यास, आमच्या क्षेत्रात ड्रोनचा वापर अधिक व्यापकपणे पाहता येईल,”
मारुत ड्रोन अकादमीचे ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम निरंजन यांच्यासारख्या स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनवत आहेत, त्यांना ड्रोन चालवण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये प्रदान करत आहेत आणि त्यांची उत्पादकता वाढवत आहेत. जसजसा ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब वाढत आहे, तसतसे महाराष्ट्रात शेतीमध्ये क्रांती घडवून आणण्याचे, शेती अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि सर्व संबंधितांसाठी सुरक्षित करण्याचे वचन त्यामध्ये अध्याहृत आहे.
———————————————-


