Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेश निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची डॉ.फिरोज बख्त अहमद यांचे विचारः २९ व्या...

देश निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका महत्वाची डॉ.फिरोज बख्त अहमद यांचे विचारः २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालाचा समारोप समारंभ

पुणे,दि.३० नोव्हेंबर: ” देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आजद यांनी देशात उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. देश निर्मितीसाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे हे त्यांनी जाणले होते.” असे विचार दिल्ली येथील मौलाना आजाद नॅशनल उर्दु युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू डॉ.फिरोज बख्त अहमद यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी विश्वशांती केंद्र विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच प्रा.शरदचंद्र दराडे पाटील, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, २९ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेचे समन्वयक व प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे आणि डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
यावेळी योगाचार्य मारूती पाडेकर गुरूजी आणि प्रा. अतुल कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ.फिरोज बख्त अहमद म्हणाले,” आजाद यांनी हिंदू मुस्लिम एकतेवर अधिक भर दिला. महात्मा गांधी आणि पं.नेहरू यांच्या खांद्याला खांदा लावून देशाला प्रगतीपथावर नेण्यास कार्य केले. धर्मा ने मुस्लिम असून सुद्धा आजाद यांनी सर्वधर्माचे पालन केले. १६ जुलै १९४९ साली देशातील एका वृत्तपत्रात मौलाना अबुल कलाम आजाद यांच्या विरोधात एक बातमी प्रकाशित झाली होती. त्यांनी नारळ फोडून एका रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केले. त्यामुळे त्यांचा धर्म नष्ट झाला. यावर आजाद यांनी मोहम्मद अली जीना यांना उत्तर पाठविले होते की नारळ आणि घी टाकून माझा धर्म आणखी मजबूत होतो.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञानाचा संदेश जगभर पसरविण्यासाठी या व्याख्यानमाला महत्वपूर्ण आहे. भारताला विज्ञान आणि ज्ञानाची भूमी म्हणून संपूर्ण जगभर ओळखले जाते. भारतीय संस्कृती समाजात रुजविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. समाजातील लोकांचे स्वत्व, स्वधर्म आणि स्वाभिमान जागृत करुन शांततामय समाज निर्माण होण्यास मदत होईल. ”
डॉ. एस.एम.पठाण म्हणाले,” देशातील पहिले शिक्षण मंत्री मौलान अबुल कलाम आजाद यांनी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडविला. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्राला नवा आयाम दिला आहे. भारतीय संस्कृती ही अत्यंत प्राचिन व ऋषिमुनींची आहे.”
यावेळी मारूती पाडेकर गुरूजी यांनी योगासनाचे महत्व सांगून सर्वांना उत्तम आरोग्य ठेवण्याच्या शुभेच्छा दिल्यात.
ड़ॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments